-
उद्देश-शहरी दारिद्रय निवारणाचा
0झोपडपट्टीतील सामाजिक कार्याची सांगड अभ्यासकाच्या भूमिकेतून तपासण्याचा. त्यावर विचार करण्याचा. तोडगा निघतो का ते पाहण्याचा. सोपे नव्हते ते. झोपडपट्टी नावालाच किती विरोध होता, पण डॉ. रमेश साने सर यांच्या प्रोत्साहनामुळे, मुंबई विश्वविद्यालयात वेगळा विभाग उघडण्यापर्यंत झेप घेता आली. या विषयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला, त्याची प्रचिती आली.
-
वास्तव कुपोषणाचे
0हे पुस्तक लिहिण्याचा विचार मनात का आला?
मेळघाट, पालघर, ठाणे ग्रामीण, पेठ, सुरगणा, अकलकुवा, धडगाव या भागातील आदिवासी जनतेच्या जीवनाचे ‘वास्तव’ समोर आणण्यासाठी मान. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मा. उद्धवसाहेब यांनी या भागात काम करण्यासाठी प्रेरणा दिली म्हणूनच हे सर्व मांडू शकलो. मृत्यू अटळ आहे. शासकीय योजनाही आहेत; पण मृत्यू रोखण्यासाठी कुठे कमी पडतात ते वास्तव मांडण्यासाठी हे लेखन!
-
सेतुबंध
0हा वकीलसाहेबांचा चरित्र ग्रंथ नाही, किंवा गौरवगाथाही नाही… हे आहे तपस्या व पुरुषार्थाचे एक प्रदीर्घ शब्दांकन !!!
गुजरातमध्ये संघकार्य आणि संघपरिवारामध्ये वकीलसाहेबांचे एक अनोखे स्थान… गुजरातच्या जनजीवनात त्यांचे अनोखे योगदान… शब्दांच्या माध्यमातून सर्वकाही यथार्थ उभे करणे शक्य नाही. तरीसुद्धा वकीलसाहेबांच्या प्रती अंतःकरणाचा उत्कट-भाव हे सर्व शब्दरूपी व्यक्त करण्याची प्रेरणा आहे त्यासाठी हा ‘सेतुबंध’