-
अन्न हे पूर्णब्रह्म
0विविध भाज्या, फळे, मसाले ज्यांचा ह्या पुस्तकात उल्लेख केला गेला आहे. त्यांचे महत्त्व बच्चा आणि राणी सोबतच छोट्या वाचकांनाही पटेल, आणि ह्या रोजच्या जिन्नसांच्या गमतीजमती बाल वाचकांचा आनंद द्विगुणित करतील.
-
आला मनात श्रावण
0मन आणि निसर्ग. दोन्हीची रूपं क्षणाक्षणाला बदलणारी. बदलाचे सातत्य तरीही सूत्र सांभाळणारी. यांच्याच सहचर्याने जगणं चालतं. कधी एकमेकांवर परिणाम करीत, कधी एकमेकांना सामावून घेत. मनात साठलेली निसर्गाची रूपं अलवार शब्दांत उलगडतात. भावनांच्या हजार रंगांचे चित्र शब्दांत उमटविण्याचा छंद लागतो. चाकोरीतल्या जीवनाचा वेध घेताना देखील आभाळाची आस लागते, साध्या सरळ मनाचा ठाव शोधणार्या शब्दांना.
-
दिगंतराची धून
0हे जगणे सुंदर, तरिही भासे न्यून
प्राणांत लहरते दिगंतराची धून
मी इथे भोगते देहपणाचे सौख्य
पण पैलथडीचे लोभवते मज दुःख…प्रतिभा संपन्न कवयित्री आश्लेषा महाजन ह्यांच्या अनेक दर्जेदार मुक्तकांपैकी हे एक आशय संपन्न मुक्तक आहे. मुक्तकांचे मिताक्षरी वळण कवयित्रीच्या सलग दीर्घचिंतनाचा परीघ विस्तारत नेते. मुक्तकांच्या आशय सूत्रातून केंद्रभागी असणारे व्यामिश्र जीवन, बदलता भोवताल, प्रेमातील प्रेयस अनुभूतीच्या विविध भावछटा कवयित्रीने फार सुंदररीत्या अधोरेखित केल्या आहेत.
-
विरंगुळा
0‘जय स्वावलंबन’ हा आईचा कानमंत्र होता. कोणत्याही कामाची लाज वाटता कामा नये; आपल्याला काम येत असेल तर मदत नी सही सावध असतात आणि आपणही त्यांच्यावर अवलंबून नसतो हे तिचे साधेसुधे तत्त्व होते. अनेकांच्या पत्रिका पाहणे, जुळवणे, संकटप्रसंगी त्यांना मानसिक आधार देणे, यात माझ्या वडिलांचे तिला संपूर्ण सहकार्य होते. याचबरोबर कीर्तन करणे, चतुर्मासांत प्रवचने करणे, गप्पा मारता मारता एकीकडे स्वेटर विणणे, बाळंतविडे, कापडी- कागदी फुले बनवणे हे असे अनेक किरकोळ वाटणारे, पण खटाटोपी उद्योग ती निरलसपणे करीत असे. यातून मिळालेले सारे मानधन ती सेवाभावी संस्थांना देत होती. स्वतःपेक्षा दुसर्यांचे हित तिने कायम पाहिले व जपलेही.